संधीचा फायदा घ्या! घरपट्टी व पाणीपट्टीवर ५०% सूट; ३१ डिसेंबरपर्यंत मुदत..

Screenshot_2025-12-17-16-50-18-03_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) तुम्ही जर गावात राहत असाल आणि तुमची ग्रामपंचायतीची घरपट्टी किंवा पाणीपट्टी थकली असेल, तर तुमच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. अनेकदा कराची थकबाकी वाढल्यामुळे ती भरणे कठीण होऊन बसते. मात्र आता ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’अंतर्गत तुम्हाला या थकबाकीवर चक्क ५०% सवलत मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या योजनेचा लाभ नक्की कोणाला आणि कसा घेता येईल.

राज्य शासनाने १३ नोव्हेंबर रोजी काढलेल्या जीआरनुसार, ही सवलत केवळ ‘निवासी मालमत्ता धारकांसाठी आहे. म्हणजेच तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत असाल तरच तुम्हाला हा फायदा मिळेल. व्यावसायिक गाळे, दुकाने किंवा औद्योगिक वापराच्या जागेसाठी ही सूट लागू नाही. यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराचा समावेश होतो.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. तुम्हाला २०२५-२६ या चालू वर्षाचा कर आणि १ एप्रिल २०२५ पूर्वीची सर्व थकबाकी एकत्रितपणे ग्रामपंचायतीकडे जमा करावी लागेल. जर तुम्ही ३१ डिसेंबरच्या आत ही रक्कम भरली, तर तुम्हाला मूळ थकबाकीवर ५०% सूट दिली जाईल. थोडक्यात सांगायचे तर, अर्धी रक्कम माफ होणार आहे!
ही योजना राबवण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुमच्या ग्रामसेवकाशी किंवा सरपंचाशी लवकरात लवकर संपर्क साधा आणि ३१ डिसेंबरपूर्वी कराचा भरणा करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. लक्षात ठेवा, ही सवलत मर्यादित काळासाठीच आहे!

You may have missed

error: Content is protected !!