अनुराधा फार्मसी महाविद्यालयाचा पराक्रम…कठीण स्पर्धेतही १००% प्रवेश अन् राज्यात अव्वल स्थान !

IMG-20251128-WA0004

निलेश कोल्हे

चिखली : राज्यात फार्मसी कॉलेजच्या संख्येत झालेली मोठी वाढ व दर्जा टिकवून ठेवण्यात महाविद्यालयांना यश न आल्याने अनेक महाविद्यालये रिकामी पडत आहे. मात्र चिखली येथील अनुराधा फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीस उतरले असून, प्रवेश प्रक्रियेत मिळवलेला १०० टक्के प्रवेशाचा पराक्रम हा संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारा ठरला आहे. राज्यातील ५३१ महाविद्यालयांपैकी अव्वल १८ महाविद्यालयांत अनुराधा फार्मसीने दिमाखदार स्थान पटकावले आहे, हे विशेष!

यंदा राज्यातील ५३१ फार्मसी महाविद्यालयांपैकी १० महाविद्यालयांत शून्य प्रवेश, ३७ महाविद्यालयांत १० पेक्षा कमी विद्यार्थी, तर एकूण ४८,८७८ जागांपैकी फक्त ३२,९५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने क्षेत्राचे गंभीर चित्र समोर आले आहे. अशावेळी केवळ १८ महाविद्यालयांनीच १०० टक्के क्षमतेने प्रवेश भरले. त्यात अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने आपले स्थान राखत राज्यात अव्वल स्थान मिळवले.

अनुराधा फार्मसी ग्रुपची महाविद्यालये त्यांच्या नियमित व उत्कृष्ट प्रॅक्टिकल-केंद्रित शिक्षण पद्धती, उच्चस्तरीय अकॅडमिक उत्कृष्टता, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा, तसेच संशोधनासाठी उपलब्ध अत्याधुनिक सुविधा यांमुळे जिल्ह्यातील आणि प्रदेशातील सर्वात आघाडीच्या संस्थांमध्ये गणल्या जातात.अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत दरवर्षी मोठ्या संख्येने चमक दाखवणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी ही शैक्षणिक दर्जाची ठोस साक्ष आहे.

महाविद्यालयांकडे ४००हून अधिक क्षमतेचे उत्तम मुलींचे वसतिगृह, विद्यार्थ्यांसाठी इंडोर व आउटडोर गेम्सच्या सुविधा, तसेच २५वर्षांहून अधिक अनुभव असलेले गुणवंत प्राध्यापक आणि त्यांचा उत्कृष्ट रिटेन्शन रेट संस्थेची भरभक्कम ताकद आहे. या भागातील सर्वात पहिले फार्मसी महाविद्यालय म्हणून १९९४साली स्थापन झालेल्या अनुराधा फार्मसी ग्रुपकडे देशभरात आणि विदेशात कार्यरत असलेल्या ३००० हून अधिक माजी विद्यार्थ्यांची मजबूत व सक्रिय विद्यार्थीसंघटना आहे, जी नव्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन आणि मदत करत राहते. GPAT सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिळवलेले सततचे यश ही महाविद्यालयाची अभिमानाची कामगिरी आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी दरवर्षी विशेष तज्ञांचे गेस्ट लेक्चर्स, लेक्चर सिरीज, तसेच मॉक टेस्ट्स आयोजित करून त्यांची शैक्षणिक पातळी अधिक सक्षम केली जाते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे अनुराधा फार्मसी ग्रुपची महाविद्यालये केंद्रिय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे ठरत आहेत, आणि दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास उत्सुक असतात.

या यशाकरिता संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, प्राचार्य डॉ. काळे, प्राचार्य डॉ. पागोरे, प्राचार्य डॉ. बिहानी यांच्यासह संपूर्ण प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

गुणवत्तेलाच विद्यार्थी प्राधान्य देतात : राहुल बोंद्रे

राज्यातील अनेक महाविद्यालये रिकामी पडत असताना अनुराधा फार्मसी महाविद्यालयाचे पूर्ण क्षमतेने भरलेले प्रवेश हे महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकाची, दर्जेदार शिक्षण पद्धतीची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या कटिबद्धतेची पावती आहे.
अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने आपल्या उत्तुंग कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, गुणवत्तेला विद्यार्थी नेहमीच योग्य प्राधान्य देतात आणि म्हणूनच अनुराधा फार्मसी कॉलेज आज विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनले आहे. विद्यार्थी हिताला समोर ठेवून महाविद्यालयाच्या प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत ठेवणार असल्याचे, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!